Tuesday, September 11, 2018

मैत्री ....

                  मैत्री  कसा  छोटासा शब्द आहे न ..... अगदी दोन  अक्षरांचा पण तेवढं च नव्हे तर त्यामागे दडलेल्या हजारो  अनगिनात भावनेचा ...... कधी प्रेम तर कधी काळजी .... कधी हक्काचा राग तर कधी रागाचा हट्ट ...... कधी  आलेले आनंदाश्रू तर कधी एकमेकांचे बघितले न जाणारे अश्रू .... कधी न थांबणारी बडबड  तर कधी सहन  न होणारा  अबोला ..... 
                  आयुष्याच्या या वेगवेगळ्या वळणावर अनोळखी व्यक्ती भेटतात .  वेगळे विचार ,वेगळे राहणीमान ,वेगळ्या आवडीनिवडी ,वेगळ्या  वाटा . वाटा बदललेल्या तरी मैत्री मात्र बदलत नाही .  ऋतू बदलतात तसेच लोक हि बदलतात पण जसे   पळसाला पाने तीनच असतात तशीच खरी  मैत्री असते कधीही न बदलणारी . 
कधी सुखात तर कधी दुःखात साथ न  सोडणारी . 
                   मैत्री म्हणजे   काळजाने काळजाशी केलेलं नातं  ......  काही वेळा जगाची बंधने स्वीकारून तर काही वेळा जगाची बंधने तोडून स्वतःच्या बंधनाचे उदघाटन करणारी मैत्री च असते . कधी जीव लावणारी ,कधी मौजमजेत हरवून जाणारी ,आयुष्याचे वेगवेगळे धडे शिकवणारी मैत्रीच ,रक्ताचे नाते जरी नसले तरी ऋणानुबंधाची नाळ जोडणारी मैत्री च असते .. 
                   कधी भूतकाळात तर कधी भविष्यात रमवणारी मैत्री जेव्हा अबोला करते न तेव्हा त्रास  होतो ,कळत न कळत  आपली आता तशी मैत्री राहिली नाही असं जेव्हा कोणी तरी बोलून जात न तेव्हा डोळ्यात अश्रू यायला वेळ लागला तरी मनात मात्र अश्रूच तुफान उठतं , समोरच्याशी नजर मिळवून बोलण्याची पण शक्ती त्यावेळी नसते  ....... नक्कीच भीती असते काहीतरी  अनमोल गमावण्याची   ......... 
                 "मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वाराअसतो  ,
                    विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो  ,
                 "मैत्री "हा असा खेळ आहे जो दोघांनीहि खेळायचा असतो . 
                    एक बाद  झाला तरी 
                    दुसर्याने डाव सांभाळायचा असतो .  "